सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………
” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?”
“नारायणा , एकदम कठीण काळ आहे , ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ”
“असे किती दिवस चालणार ”
“फार काही नाही , ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त खूप त्रास होणार , अनेक अडचणी, हालअपेष्टा , दैन्य दारिद्र्य.. ”
“आणि मग नंतर ? ”
“नंतर तुला त्याची सवय होईल! “